मी आज जो कोणी आहे ते केवळ अजय देवगणमुळे-रोहित शेट्टी

रोहित शेट्टी आजच्या घडीला बॉलिवूडमधला सर्वात आघाडीचा दिग्दर्शक आहे.विशेष म्हणजे या सर्व यशाचं श्रेय तो अभिनेता अजय देवगनला देतो. ‘गोलमाल’, ‘गोलमाल अगेन’, ‘गोलमाल ३’, ‘सिंघम’, ‘सिंघम रिर्टन’ अशा चित्रपटात रोहित -अजय देवगनच्या जोडीनं एकत्र काम केलं आहे. हे पाचही चित्रपट बॉलिवूडमध्ये सुपहिट ठरले. म्हणूनच या यशाचं सारं श्रेय त्यानं अजयला दिलं आहे.
‘मी आज जो कोणी आहे ते केवळ अजय देवगणमुळे, तो माझा मोठा आधारस्तंभ आहे. माझ्या आयुष्यातील त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. रणवीर माझ्यासाठी लहान भावासारखा आहे पण, अजयचं माझ्या आयुष्यातील स्थान खूपच खास आहे. ‘ असं म्हणत रोहितनं भावूक प्रतिक्रिया दिली आहे.लवकरच ‘गोलमालचा’ चौथा भाग घेऊन ही जोडी रुपेरी पडद्यावर परतणार असल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –