‘मिस्टर इंडिया’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘मिस्टर इंडिया’ आता हा चित्रपटाचा नव्याने पुन्हा येणार ही बातमी समजताच चित्रपट कधी येणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. परंतु श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला आणि मिस्टर इंडियाला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले होते.
आता बोनी कपूर यांनी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच असणार आहे.