‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचं झालं लग्न

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील पटकथा लेखक तेजपाल वाघ लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अभिनेता निखिल चव्हाण यांनी एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत हि माहिती दिली आहे.
या पोस्टला कॅप्शन देताना झालं बाबा एकदाचा…. अभिनंदन वाघोबा.. ते न्हव ..आता पुढचा नंबर कोणाचा असेल..? तुम्हाला काय वाटतं..?’ तेजपाल यांनी लागीरंची पटकथा लिहिली होती. अभिनयात रस असलेला तेजपाल यांना या मालिकेच्या निमित्ताने लेखक म्हणूनही प्रसिद्धी मिळाली.