गुरूने केलं शनायाशी लग्न तरीही राधिका त्याला परत मिळवू शकेल का ?

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत मोठे कठीण प्रसंग सुरू आहेत. गुरूनं शनायाशी मंदिरात जाऊन लग्न तर केले पण तो अजूनी राधिकाकडे राहतोय. आता राधिका काय करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
राधिकाचा मित्र सौमित्र राधिकाला सल्ला देतो की तू पोलिसात तक्रार कर म्हणून. कारण पहिली बायको असताना दुसरं लग्न हा गुन्हा आहे. पण राधिका त्याला जे उत्तर देते, ते धक्कादायक आहे.राधिका त्याला सांगते की माझं गुरूवर प्रेम आहे. माझं पहिलं प्रेम. जे कधी विसरता येणार नाही. मी गुरूला परत मिळवेन, असं ती सौमित्रला सांगते.
आता राधिकाचा नवा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात ती गुरुला जिंकते की पुन्हा गमावते हे लवकरच कळेल.गुरूनं नोकरीत राजीनामा दिलाय. घरदार सोडून तो शनायाकडे आला आहे.
या महाएपिसोडमध्ये गुरू शनायाला घेऊन पळून जातो. राधिका किंवा तिची आई या कोणालाच माहिती लागू न देता. भटजींना बोलवून दोघांच्या लग्नाचे विधी सुरू होतात.लग्नाचे फेरेही घ्यायला सुरुवात होते. तीन फेरे घेतल्यावर तिथे अचानक येते राधिका.आता पुढे काय होणार हे पाहणे मज्जेशीर ठरणार आहे .
महत्वाच्या बातम्या –
- कपूर कुटुंबात लवकरच अजून एक लग्न
- ‘आनंदी गोपाळ’चा टीझर पाहिलात का?
- ….म्हणून ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला हार्दिक पांड्या, के एल राहुलचा एपिसोड
- सुनील ग्रोव्हरचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ होणार बंद !